उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
भारतातील अनेक भागांमध्ये सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या तापमानामुळे काही राज्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Severe Heatwave
सतत वाढणाऱ्या तापमानामुळे दिवसभर गरम आणि दमट हवामान जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि तज्ज्ञांनी उन्हाळ्याच्या तापापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन, हलका आहार, आणि उन्हापासून बचाव करणारे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे.
विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासूनच आजारी असलेल्यांनी गरजेचा काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गरज नसल्यास दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी व सावली उपलब्ध करून देण्याचे उपाय सुचवले जात आहेत. नागरिकांनी देखील आरोग्याच्या दृष्टीने सजग राहावे, आणि उष्माघातासारख्या त्रासांची लक्षणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
Severe Heatwave
देशभरात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत असून ती पुढील काही दिवसांपर्यंत सुरू राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात २९ एप्रिलपर्यंत तीव्र उष्णतेचा अनुभव येणार आहे, तर उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागांमध्येही अशाच स्वरूपाचे तापमान जाणवेल. पूर्व भारतातदेखील २६ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
गंगेच्या पश्चिम बंगाल भागात, बिहार आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये आधीच गंभीर उष्णतेची लाट नोंदवली गेली आहे. याशिवाय, पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ, आणि सौराष्ट्र-कच्छ भागात उष्णतेची लाट सुरु आहे, तर झारखंडमध्ये गरम आणि दमट हवामानाने नागरिक त्रस्त आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा इशारा दिला आहे.Severe Heatwave
येणाऱ्या आठवड्यात पश्चिम मध्यप्रदेश, पश्चिम राजस्थान आणि पूर्व मध्यप्रदेशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, ओडिशा, झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगाल भागात २६ एप्रिलपर्यंत उष्णतेचे तीव्रतेने प्रभाव राहणार आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पूर्व राजस्थानसाठी २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता जाणवत असून पुढील काही दिवस ती अधिक वाढणार आहे. येथील कमाल तापमान ४०°C ते ४३°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान १८°C ते २५°C दरम्यान राहील. वाऱ्यांचा वेग १० ते २० किमी/तास इतका सौम्य राहणार असून, मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम दिशेने वाहणारे वारे अनुभवास येतील.
दिल्लीसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ एप्रिलपर्यंत आकाश साफ राहण्याची शक्यता आहे आणि दुपारी तापमान उच्चतम स्तरावर पोहोचणार आहे. त्यामुळे दुपारी गरजेअशिवाय घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि हलके, आरामदायक कपडे परिधान करावेत.
याचसोबत बिहार, ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगाल भागात रात्रीही गरम हवामानाचा त्रास जाणवणार आहे. तसेच, २३ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी, कोस्टल आंध्रप्रदेश, रायलसीमा, केरळ आणि गुजरातमध्ये गरम आणि दमट हवामान कायम राहणार आहे.