Rahuri News : राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्राशेजारील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी आणि बोरवेल्सची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटल्याने ऊस व चारा पिकांवर वाईट परिणाम होत असून, पिके करपत आहेत. अशा संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मुळा इरिगेशनकडे तातडीने मुळा नदी पात्रात पाणी सोडण्याची आणि मानोरी, मांजरी बंधारे भरून देण्याची मागणी केली आहे.
मुळा नदी पात्र कोरडे, ऊस-चारा संकटात; शेतकऱ्यांचा संताप Rahuri News
यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे नदी पात्र आणि बंधाऱ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले असून, पाणीपातळी घटली आहे. जमिनीची पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी व बोरवेल्स कोरडे पडले असून, पंप बंद पडण्याची वेळ आली आहे. परिणामी गिन्नी गवत, घास, मका, ऊस आणि भाजीपाला या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.Farmers’ Anger Erupts Over Dry Fields and Water Shortage
गेल्या वर्षी मुळा नदी पात्रात वेळेवर पाणी सोडून बंधारे भरले गेले होते, मात्र यंदा अद्याप तसे झालेले नाही. प्रवरा नदी पात्रात पाणी सोडले असले तरी मुळा नदीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वळण, पिंपरी वळण, मानोरी, आरडगाव, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, चंडकापूर, मांजरी, तिळापुर आदी गावांतील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
मुळा नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी यशपाल पवार, ब्रह्मदेव जाधव, ऋषी जाधव, वाल्मिक डमाळे, अभिमान जाधव, सुनील मोरे, जालिंदर काळे, बाळासाहेब म्हसे, अनिल आढाव, राजेंद्र आढाव, शिवाजी आढाव, पोपटराव पोटे, बापूसाहेब वाघ, रवींद्र आढाव, नवनाथ थोरात, बी. आर. खुळे, ज्ञानेश्वर खुळे, बाबासाहेब खुळे, गोरक्षनाथ डमाळे, बाबासाहेब कारले, मुकिंदा काळे आदी शेतकरी पुढे सरसावले आहेत.Rahuri News
चालू वर्षी मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची पाणी पातळी घटल्याने बोरवेल आणि पंप बंद पडले आहेत, तर पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची तीव्र गरज भासू लागली आहे. मानोरी केटी कोरडी पडली असून, पंधरा दिवसांपूर्वीच पात्रात पाणी सोडणे गरजेचे होते. शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी करताना सांगितले की बंधारे भरल्यास केंदळ खुर्द, चंडकापूर, केंदळ बुद्रुक आणि मानोरी परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळेल.